पालक प्रबोधन

  • मुलांचे चालणे

    लहान मूल हळू हळू उभे राहाते व हलकेच एक एक पाऊल पुढे  टाकून चालावयास लागते. आईला त्याचे कौतुक वाटते.  घरातील सर्वजण कौतुक करतात.’अरे पाहा, बाळ चालायला लागला!” म्हणून सर्व त्यास  उत्तेजन देतात. मूलही हौशी-हौशीने चालू लागते. झोक जातो,  पडते,  पुन्हा उभे राहते, पुन्हा चालते. पुन्हा पडते, पुन्हा उठून चालू लागते. अशा प्रकारे त्याच्या मानाने अत्यंत मेहनतीने चिकाटीने व…

    read more…

  • शैशव

    मित्रहो, दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना अर्भके म्हणतात. पुढे दोन ते सहा-सात वर्षांपर्यंतची छोटी मुले म्हणजे शिशु.  आपली मुले आधी आपल्या अंगाखांद्यावर व पाळण्यात वाढत असतात. ती जरा मोठी झाली की अंगणात खेळू लागतात. तेच शिशुपण आपण जरा बारकाईने पाहू लागलो तर ती कशी वाढत असतात ते आपल्याला दिसते. आज मी शिशुपणात मुलांची वाढ कशी होते, ती…

    read more…

  • स्पर्धा व चढाओढ

    “चढाओढ असल्याशिवाय मुले चुरशीने अभ्यास कसा करणार ? अधिक मेहनत घेऊन अभ्यास करायला मुलांना काही तरी असे तत्त्व असलेच पाहिजे. नाहीतर त्यात काही मजा वाटत नाही.” सामान्यतः सर्व पालकांचे मत असेच असते व पुष्कळशा शिक्षकांचेही तसेच असते. “धावा धावा. पाहू कोण पुढे जाते ते. सर्वात पुढे जाईल त्याला बक्षीस!” असे शब्द जवळ जवळ सर्वाच्या तोंडी…

    read more…

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.