-
बालकांस गोष्ट सांगताना खालील नियम ध्यानात ठेवण्यासारखे आहेत. हे करू नका. हे जरूर करा. एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं एके दिवशी खूप पाऊस आला. कावळ्याचं घरटं वाहून गेलं. आणि चिमणीचं तसंच राहिलं. अशा रीतीने गोष्ट सांगता येते. त्यांना पाच सात वेळा अशी सांगितल्यावर हळू
-
शिष्ट बालकथांच्या शेवटी तात्पर्य रूपाने काही नीतीबोध असतो. पण आजीबाईंच्या बालकथांच्या शेवटी पुष्कळदा काही तरी ग्राम्य विनोद असतो. उदाहरणार्थ ऊ टू ची गोष्टच घ्या. शेवटी काय? तर पादू कशी? ढम् दिशी! कोल्हा म्हातारीची बोरे खाऊन जात होता. त्या गोष्टीच्या शेवटीही असेच “या या कोल्होबा बोरं पिकली” “नाही नाही म्हातारे कुले भाजले” किंवा आता जरा शिष्ट
