शिक्षक शिक्षण

  • बालकांचा व्यायाम

    “तुमच्या बालशाळेमध्ये मुलांच्या व्यायामाची काय सोय आहे? त्यांच्या शरीर विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. नाही का?”“शरीर विकासाकडे या वयात विशेष लक्ष दिले पाहिजे ही गोष्ट आम्हास पूर्ण संमत असून ती आम्ही नेहमी डोळ्यांसमोर ठेवतो व त्याकरिता व्यायामाची साधने ठेवण्याऐवजी विश्रांतीची साधने ठेवतो व विश्रांती घेण्यास शिकवतो.”“म्हणजे? मुलांना व्यायाम नकोत असे तुमचे म्हणणे आहे की काय?”“नव्हे,…

    read more…

  • बालजीवनात चित्रकामाचे स्थान

    मागील लेखांत चित्रकामाचा ज्ञानार्जनाशी कसा निकट व महत्त्वाचा संबंध आहे त्यासंबंधी विचार केला. आता बालजीवनात चित्राचे स्थान पाहू या. आम्ही शाळेच्या मुलांस किहिम येथे पर्यटनास नेले. मुले समुद्र, नारळाची वाडी, डोंगर, बोट वगैरे गोष्टींनी इतकी खूश झाली की त्या सर्व गोष्टीची खोल छाप मनावर बसली. घरी आल्यावर त्यासंबंधी पुन्हा पुन्हा बोलली, भाषणे केली. वर्गात लेखनातही…

    read more…

  • भाषाशिक्षणाचा पाया

    बालमंदिरात अडीच वर्षांपासून सहा वर्षे वयापर्यंतची मुले असतात. या मुलांचे सुद्धा भाषा शिक्षण असते. मुलांची अक्षरे पुरी झाली, लिहा-वाचायला लागली म्हणजेच भाषा शिक्षण सुरू होते, अशी कोणाचीही कल्पना असल्यास ती चुकीची आहे. भाषा ही काही नुसती लिहिण्या वाचण्याची गोष्ट नाही, पण मुख्यतः ती बोलण्याची आणि ऐकण्याची गोष्ट आहे. ऐकून ऐकून मूल भाषा शिकते. उच्चार शुद्धीवरच…

    read more…

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.