शिक्षक शिक्षण

  • मुलांचे शब्दभांडार

    मूल बोलू लागते. आपण घरातली मंडळी त्यास शिकवू लागतो. मूल पा-प्पा-प्पा बाब्बाब्बा, मम्मम्म करते. आपण शिकवतो बाबा म्हण, मामा म्हण, मं मं म्हण.पहिल्यांदा मुलांच्या तोंडात नुसते अर्थरहित उच्चार असतात. पुढे ते अर्थ असलेले शब्द बोलू लागते. कित्येक शब्द आपल्यापासून ते शिकून म्हणते, तर त्याच्या कित्येक शब्दांना आपण अर्थ देतो. म्हणजे आपला अर्थ व्यक्त करण्यासाठी ते…

    read more…

  • चित्रकाम व ज्ञानार्जन

    “आमचा मुलगा इतके दिवस शाळेत येतो आहे. पण त्या मानाने त्याच्यात काहीच प्रगती दिसत नाही. पाच वर्षाचा पुरा झाला तरी अद्याप अडखळत वाचतो.” “अहो तो चित्र खूप काढतो. सध्या त्याचे लक्ष चित्रांकडे विशेष आहे. म्हणून लिहिण्या वाचण्यात जरा मागे दिसतो. लिहिण्या वाचण्यात जाईल पुढे तो. काळजी करण्यासारखे नाही.” “अहो चित्रे तर घरी सुद्धा काढीत असतो.…

    read more…

  • मुलांना कसे शिकवाल?

    सेग्विन हा एक फ्रेंच शिक्षण शास्त्री होता व त्याने मंदबुद्धीच्या मुलांमध्ये काम केले. त्यामुळे मध्ये एकही पायरी न गाळता त्याला काम करावे लागत असे. या तीन पदांचा उपयोग सामान्य बुद्धीच्या (Normal) मुलांमध्येही फार उत्तम दिसून आला आहे. यांचा उपयोग जितका शिक्षकांना आहे तितकाच आई-बाबांनाही आहे. खरे म्हटले असता ज्यांचा ज्यांचा बालकांशी संबंध येतो त्या सर्वांनी…

    read more…

ताराबाईंविषयी

भारतातील शाळापूर्व शिक्षणाचा पाया रचणाऱ्या प्रणेत्या म्हणजे पद्मभूषण ताराबाई मोडक.

(जन्म १९ एप्रिल १८९२, मृत्यू ३१ ऑगस्ट १९७३)

आज शाळापूर्व शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असणाऱ्या अंगणवाडी या संकल्पनेची सुरुवात ताराबाईंनी केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली.  १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. त्या काळात आधुनिक समजल्या जाणाऱ्या मॉंटेसरी पद्धतीचा अवलंब करून हे बालशिक्षण ग्रामीण आणि आदिवासी विभागातही पोहोचवले. आदिवासी मुलांना शाळेत बसण्याची सवय नव्हती म्हणून शाळाच त्यांच्या परिसरात घेऊन जाण्यासाठी ‘कुरणशाळा’ सारखे यशस्वी प्रयोग केले.

१९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका  काढायला सुरुवात केली. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासद होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.

शिक्षक, पालक, विद्यार्थी, आणि शिक्षणकर्मी अशा सर्वांनाच आजही उपयुक्त होतील असे ताराबाईंचे लेख आम्ही या वेबसाईटवर प्रकाशित करत आहोत.